मंगळवार, २९ मार्च, २०११

असचं मनाला हवं म्हणुन.....

काहीतरी लिहण्यासाठी पर्रफेक्ट मुड असावा हा... काही कारण नसताना उगाच उदास का वाटावं? मग ते कारण शोधण्यासाठी लिहायला घ्यायाचं हे ठरलेलयं हं .. कारण हे मन जे मला सांगत नाही ते त्या कागदाला किंवा आता या स्क्रीनला सांगायाला लागात... सालं या मनाचही झेपतचं नाही राव.. काय हवयं त्याला? जा... आता माझाही हट्टचं आहे.. कागद किंवा या स्क्रिन आधी तू मला सांग काय झालयं तूला.......... 8-|

बर्‍याचदा मी माझ्या मनाला अशीच दटावत आले.. मग माझं लिहणंचं थांबलं.. कुठेतरी माझाच माझ्याशी संवाद तूटला.. आज एकदम जाणवलं हे... कारण आजही माझं मन माझ्या पेक्षा कागदाकडे मोकळ होऊ पाहतायं... बघु येत्या दिवसांत कदाचित ब्लॉग परत भरू लागेल अशी चिन्ह आहेत.. मनाशी पंगा कोण घेणार यार?

२ टिप्पण्या:

RAVSAHEB म्हणाले...

aamhi sudhha tyachich vaat baghtoy... valu de tujha man kagadakade... bhru det sare blog.... kadhi tari nighanarach aahe baher ti aag...

मनोज म्हणाले...

मनाशी पंगा कोण घेणार यार?
- आवडले.