गुरुवार, ४ डिसेंबर, २००८

... परत एक शोध... काहीतरी सापडविण्याचा प्रयत्न

ती रात्र काळी कुळकुळीत... कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी राहवत नाहिये.. आज्काल माझी चिडचिड वाढली आहे अस सगळ्यांचच मत आहे... माझ्या सारखी मुलगी राग व्यक्त करतेय. माझे पेशन्स् कमी झालेत... मी खूप जास्तच रिअक्ट होतेय..वैगेरे माझ्या-मित्र मैत्रिंणींच मत आहे.. हो माझे पेशन्स् नक्किच कमि झालेत.. चिडचिड वाढली आहे.. पण तिला कितपत अवास्तव म्हणाव हे कळत नाहीये..मी २६ तारखेला घटणा स्थळी होते.. एका नामांकित वाहिनीसोबत.. जे तुम्ही टिव्हीवर पाहात होता ते मी प्रत्यक्ष पाहिलय.. त्या वेळी स्वत: खूप हतबल झाल्याच जाणवत होत.. किंबहुना मी.. मी काय तिकडे असलेले सगळेच्जणं मला तसे वाटत होते.. हतबल!! आपण सगळा तमाशा डोळ्याने बघतो परंतू काहीच करू शकत नसतो... माणस येतात जखमी अवस्थेत असतात... तडफ़डत मरणाच दार ठोठावतायेत असा वाटुन जात... नातेवाईकांचा अक्रोश सुरवातीला ऐकू येत असतो परंतू नंतर सगळ सुन्न होत... ताज मधला गोळीबार ऐकलाय मी.. पोलिसांची धावपळ बघितलि आहे मी... हॉस्पिटाल बाहेरचे रक्त.. रस्त्यावरचे रक्ताचे ओघळ काही केल्या डोळ्यासमोरुन हटत नाहीत.. मी जास्त नाही लिहणार या बाबत.. मला खूप त्रास होतोय.. त्रास या बबत नाहि की मी हे बघितल आहे.. उलट बघायला मिळाल हे बर.. सत्य जाणुन घेण्याची क्षमता मला कळलि.. पण स्वतःच्या हतबल पणाची कीव येतेय... आणि परत परत तिच दृष्य येतायेत डोळ्यापुढे...
आणि एक कटु सत्य जे माझ्या मागच्या पोस्टवर झळकलय.. ते मात्र पचयला कठिण गेल होत.. अताशा तेही सवयिच झालय.. आज मला माझा एक मित्र म्हणाला का काही पाउल उचलायची भाषा कर्तेस.. का वढि भडकली आहेस.. आम्हीही भडकलो होतो पण आमची आग क्षमली.. तु ज्या लोकांसाठी करायच म्हणतेस तेच अशी भाषा बोलतात.. पण माझ उत्तर अजुनही एकच आहे.. कोणासाठी म्हणुन नाही करायचय .. करण मला करायच आहे... कोण याची दखल घेउ देत अगर नको घेउ देत मी माझा मर्ग शोधतेय.. मी माझ्या पासुनच सुरवात कर्तेय.. कोणाच्या सोबतीची आशा न ठेवता.. येणारे येतील मी मत्र आत थांबणार नाही

सोमवार, १ डिसेंबर, २००८

२६... पडसाद .. आणि...

भारताच्या इतिहासाच काळ पान.. जे काही होत ते प्रत्यक्ष बघितलं होत... रक्त.. जखमी.. आणि रक्तबंबाळ मृतदेह... रक्त रक्त रक्त.. सुरवातीला नातेवाईकांचा आक्रोश ऐकु येत होता पण नंतर काहीच ऐकू येयीनासे झाले.. सगळ शुन्य नजरेने बघणारी मी मला आला पैकी वाटु लागली आहे... या विषयावर इ नंतर लिहीन कदाचित पण आज नको.. कारण आजुनही गोळ्यांचा आवाज कानामध्ये घुमतो आहे..काल परत ताज आणि ओबेरॉयला जाऊन आले. २६ तारखेला रात्री सुरु झालेल युध्द.. काल बरच सावरलेल जाणवत होत.. त्या विभागात हे प्रकरण झाल्यापासुन तिकडे जाण्याची माझी ही तिसरी वेळ... पण काल गर्दी वाढली होती.. ताजकडे अजुन जाऊ देत नव्हते पण ओबेरॉय पाशी लोकांची झुंबड होती... आज लोक समुद्राकडे पाठ फ़िरवून होते... सगळे रिकाम्या ओबेरॉय कडे वास्ताविक पाहता त्याच्या फ़ुट्लेल्या काचांकडे आणि दहशदवाद्यांच्या गोळीबारामूळे काळवंडलेल्या खिडकीपूढे आज गर्दी करुन उभे होते... आज सगळ्याच्या हातात कॅमेरे होते... मला त्यांना एक विचारायचीखुप इच्छा होत होती की का? का काढताय फोटोज् आणि व्हिडिओ..? पण.. असो.. तिकडे एका ग्रुप ने विशेष लक्ष वेधुन घेतल... चार पाच टाळकी होती ती आपल्याच वयाची.. चार्ट पेपरवर काहिसे संदेशे लिहून आणले होते.. नंतर ते जमिनीवर ठेवुन सगळ्या लोकांना मेणबत्या देत होते... त्या पेपरवर काही संदेश लिहले होते जसे.. मुंबई आय अम विथ यु .. वैगेरे अशा आशयाचे ... मीही गेले एक मेणबत्ती लावली.. क्षणभर डोळे बंद केले.. पण मला काही केल्या शांतता मिळतच नाहीये... नंतर मी त्या मुलांशी बोलायला गेले.. त्यांच आधी अभिनंदन केल... खूप बर वाटल होत मला आत कुठेतरी कोणितरी आपापल्या पध्दतीने का होईना..पण पाऊल उचलण्याचा प्रयन्त करतय? त्यांना हे बोलुनही दाखवल.. नंतर मी त्यान्न विचारल तुम्हाला अस नहि वाटत का आपण अजुन काहितरी करायला हवय? आणि त्यांना जे काही शक्य होइल त्या बबत माहिती दिली (ती मी इथे देZणार नाही..करणं नंतर केव्हातरी) मला त्याच्या कडुन आशा होती.. पण चुकलच माझ त्या ग्रुप मधल्या एका मुलाने सरळ सांगीतल.. म्हणे नाही आमच्याने हे शक्य नाही .. करण काय तर आम्हला वेळ नसतो.. मी विचारल मग आज तरी का वेळ काधला? नो वि जस्ट वॉन्ट तु शो थे मुंम्बई डत वि आर विथ मुंम्बई... माझ टाळक सटकलच... मी Mहणाले अचुलि थॅकस् बट काही गरज नाहीये या सगळ्याची तुम्ही मुंबई बरोबर नाही मुम्बई तुमच्या बरोबर आहे तुम्हाला काही पर्याय नाही म्हणुन तुम्ही इथे आहात... आणि हे जे काही चार मेणबत्त्या जाळून तुमची शोक सभा दाखवताय किंवा तुमचा सपोर्ट दाखवताय याचीही काहीही गरज नाही.. इटस् ऑल बुलशिट.. मला कळतय तुम्ही हे का कर्ताय एक तर आज रविवार त्यामूळे वेगळा वेळ काढायची गरज नाही.. त्यात अस काही केल की 'आपण काहीतरि केल' अस समाधान मिळुन जात.. त्यात मिडिया वाले असतातच कोणास थाउक तिव्हीवर झळकायला पण मिळेल तेवढच कौतूक सगळीकडे(मी जेव्हा त्याच्याशी पहिल्यांदा बोलण्यास सुरवात केली होती तेव्हा ते मला पत्रकार समजले होते.. आणि नंतर कळल मी हे बोलायला नको हव होत)..मी खूप भडकले होते.. त्या वेळेस माझ्या डोल्यासमोर का कोण जाणे करकरे, साळस्कर, कामठे उभे होते.. संयम सुटला होता.. त्यांना म्हणाले तुमच्याशी बोलुन मी माझा वेळ आणी उर्जा दोन्हीही फुकट घालवली.. असो.. मी निघाले त्या मुलांपैकी एकाला काय वाटल कोणास ठाऊक त्याने मला माझा नंबर मागितला.. मी क्षणभरविचार केला आणी त्या मुलाला नंबर दिला.. तो म्हणाला वेट आय विल गिव्ह यु मिस कॉल.. आय सेद्ड नो नीड.. आय डोन्ट हॅव दट मच स्पेस इन माय मोबाइल.. वास्ताविक पाहता मी इतकी रुड कोणाबरोबर नसते.. पण तेव्हा माझ्या डोळ्या समोर पुर्ण २६ची रात्र होती.. आजुनही तो गोळ्यांचा आवाज घुमतोय.. अस म्हणता म्हणता आता त्या नंतर उरलेली निरव शांतता जास्तच किंचाळतेय तो आवाज त्या गोळ्यांपेक्षा कर्कश वाटतोय... आपण सगळेच काय करतोय आणी आपण काय करायला हवय? तुम्हाला काहीच छळत नाही का?
मला कळतय की मी खूप जास्त बोलतेय किंवा मी इतक बोलायला नकोय पण आत काहीतरी खूप खदखदतय.. मला एक मर्ग सापदलाय आणी त्या मर्गावरुन जाण्याचा निश्चय मी केलाय.. निदान मी प्रयत्न तरी करणार आहे.. तुम्हीही तुमचे मार्ग शोधा जर वेळ मिळालाच तर.. [ परत खवचट :( ]

सोमवार, ३ नोव्हेंबर, २००८

गर्दी.....

गर्दी गर्दी गर्दी.... किती आवाज ते.... अंगाला खेटुन जाणारी लोकं॥ पाय वाट शोधत पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय... पण आता नाही सहन होत... गर्दी गर्दी गर्दी.... जिवाच्या आकांताने ओरडतय मन.. 'ए ए.. चूप बसा...' तोंडून शब्दच फुटत नाही.. राग येतोय ...कोणाचा??? गर्दी गर्दी गर्दी....


प्रत्येक जण अस्तित्व शोधत असत ना आपली ओळख आणी त्या साठीचीच धडपड ना?? अस्तित्व ? ओळख?॥ हं.. ऐशी की तैशी त्याची... गर्दीला कुठे आलाय चेहरा? हो पण अस्तित्व असत ... पण जे जस अपेक्षित आहे तस...? गर्दी गर्दी गर्दी

मला नाही घुसायच त्या गर्दीत... नाही गुदमरायच त्यात... म्हणून॥ दुसर्‍याच रस्त्याने चालु लागते.. तरी अस्वस्थ .. आवाज अजून दबलाय... शब्द फितूर झालेत.. पाय चालतायेत नुसते कुठे का नेतायेत ठाउक नाही.. पण चालतायेत... पण साला... परत एका नव्या वळणावर पोहचले.. तिथेही परत तिच सापडली..

गर्दी गर्दी गर्दी.....

सोमवार, २० ऑक्टोबर, २००८

Happy Diwali......

दिवाळी म्हणजे आठवते ... आमची दिवाळी धनत्रयोदशी पासुनच सुरु व्ह्यायची.. त्या दिवशी आई किमान २५ जणांना घरी बोलवायची.. निमित्त तिथीने येणारा वाढदिवस... घर भरलेलं.. आईने गोडा धोडाचा घरातच घातलेला घाट... लहानपणापासून हेच बघत आलेले.. आई जाम खूष असायची... मी ज्या फ्रॉकवर बोट दाखवेन तो माझा असायचा.. बर्‍याचदा पैसेही नसायचे पण तरीही तो माझा व्हायचा.. कारण आई त्या वेळेस फक्त माझी असायची... आईने केलेले बेसणाचे लाडू.. ते फ़क्त माझ्यासाठी असायचे.. बाकी फराळातल्या गोडाला मी हातही नाही लावायचे.. ती चव आजुनही जिभेवर रेंगाळतेय.. मला दिवाळी अशी आठवतेय॥


शेवटची दिवाळी...ती पहाट.. सारस बाग.. आणि पणत्या... पहाटे पहाटे ऐकलेली गाणी .. अद्या ,मी ,आई ,काकू... आणि ती (चक्क) हवी हवीशी वाटणारी गर्दी.. ;)पाडव्याची पहाट आईने ती पहाटे पहाटे पैठणीची घडी मोडायला लावलेली.. मी वैतागुन ती घडी मोडली होती... पण दागीने कहीच घातले नाही म्हणुन आईच चिडणं आणि माझा माज .. जसे की साडी नेसुन मी तिच्यावर उपकारच केलेत... सर्रकन सरकतात आठवणी डोळ्यासमोरुन... आईची दांडगी हौस...


तिच्या शिवायची मागची दिवाळी स्मरतही नाही... कारण ती नेहमी सारखी घर भरलेली नव्हती.. मुळात मी माझ्या घरीच नव्हते... मला आवडलेला ड्रेस घेऊन द्यायला ती नव्हती.. पाडव्याच्या पहाटेची मैफील पण... कोणाच्या लक्षात न राहिलेली धनत्रयोदशी...
पण या वर्षी मी मला आवडणारा ड्रेस घेतला.. मला हवा तो... आईनेही तेच केल असत... मी साड्या घेतल्या माझ्या दोन आईसमान व्यक्तींसाठी... काही गंमती जिवाभावाच्या मैत्रिणींसाठी ... आता बाबांची वाट बघतेय... बाबांना हव ते घेउन ध्यायचय.. माझ्या दिवाळीची तयारी तर झाली.. आता दिवाळीही मजेत जाइल.. ती नक्कीच बघत असेल... :)


(वाक्याचा क्रम गंडलाय ठौक आहे तरीही जसे विचार आले तस लिहित गेलेय.. त्या मुळे समजुन घ्याल ही अपेक्षा)


तुम्हालाही दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा...

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २००८

पर्व ....

सगळच बदलतय... परत एकदा नव्याने गवसायला लागलय काहीतरी... काहीतरी हरवल्याच दुःख मागे कुजबुजतयं पण... मागचं मागे ठेवायची सवय आताशा मनाला लागली आहे.. मुठभर आठवणी सोबत ठेवायच्या पुढच्या प्रवासासाठी.. तोपर्यत सवयही होते.. मग काही दिवसांनी त्या आठवणींचही ओझ होत... पण ती वेळ यायला वेळ आहे.. मध्ये बरच काही घडतं... एकटेपणा छळछळ छळतो.. मनाला अडकून राहण्याची सवय असते ना.. त्याला त्या मोकळेपणाचा वैताग येतो.. अजून बरच काही.. पण आपण आपल्याला आपलीच सवय करुन ध्यायची.. मी म्हणुन मला कधी भेटायचेच नाही कधी.. ती भेट घडवयची... काही कप्पे बंद करायचे.. का आणि किती दिवसांसाठी माहित नाही पण बंद नक्की करायचा.. जग नव्याने सापडु लागत आणि दिसुही... बघ असही जगून... मरण यातना वाटतील पण नंतर तुच या सगळ्यावर हसशील... सगळच बदललय नाही? हा बदल खुप शिकवतो.. आणि मग प्रत्येक बदलाबरोबर आपण शिकतच जातो... सगळ्यांना हे माहित आहेच पण तरिही इथे हे स्वतःसाठी... एक पर्व संपल म्हणायचं .. नाह... ही नव्या पर्वाची सुरवात आहे...
माझी खळबळ केव्हाच संपली.. तरी मी एक वादळ असं का?

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २००८

...

रास्ते हमेशाही नये लगते है
हर मोड अंजाना होता है
आखे ढुंडती है कुछ
पर सामने सिर्फ़ कोहरा नजर आता है

एक हवा का झोका छु के जाता है
तब कुछ अपनापन मेहसुस होता है
पर वो टिक नही पाता
बस अपना एहसास छोड जाता है
ओर सामने फ़िर वो अकेला अजनबि रास्ता.. कोहरा ओर मै


...Sneha

गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

काचेपल्याड

काल मी धारावीला गेले होते. या आधी धारावी गाडीतुन बघितली होती. येणारी दुर्गंधी आणि बाहेरची घाण बघुन काचा आपोआप वर झाल्या होत्या. पण काल वस्तीत जाण्याची संधी मिळाली. हॉस्टेल मद्ये एक मैत्रिण आहे.. सोशल वर्कर म्हणुन काम करते. तिला तेथुन बोलावण होत. एका बाबाजी नामक इसमाचं. त्याच एकुणच प्रस्थ मोठं हे कळायला वेळ लागला नाही आणि म्हणे तोही सोशल वर्कर म्हणुन काम करतो. (मला त्यांच्या कामाची आणि एकूणच त्यांच्याबद्दलची काही कल्पना नाही त्या मूळे मी त्या बद्दल काही लिहिणार नाही.) तर त्या इसमाच्या घरी जाण्याच्या निमित्तने का होईना मला धारावी बघायला मिळाली. म्हणजे तशी फक्त तोंड ओळख झाली असं म्हणाव लागेल.
पण परत एक वेगळ जग दिसल.. वेगळी माणसं.. परत एकदा तिच काच समोर आली.. हेही काचेपल्याडच जग... पण हे विश्व निराळ.. इथे मजबुरी.. गरिबी.. याची पुट चढवलेल्या माणसचं... यांची घरं बाहेरुन झोपडी आणि आतून ? वेल फर्निशड् घर... बर मी गेले त्यांच्या घराला झोपडी पण म्हणता येणार नाही... वितभर बंगला म्हणता येईल... अतिशयोक्ती नक्कीच नाही ही..
मला नक्की काय जाणवल थोडक्यात सांगते... या लोकांमध्ये काच ओलांडायच सामर्थ आहे पण इच्छा? इच्छा आजिबत नाही.. इथली मुलं मोठ होण्याच स्वप्न बघत नाही अस मुळीच नाहीये.. ते ती बघतात पण सगळ्यांच एकच स्वप्न आहे मला हिरो किंवा हिरोइन बनायचं.... ही का घडतय? वस्तीत शौचालय असतात मान्य आहे पुरेसे नसतील पण जे आहे ते वापरण्याची अक्कल? पैसा आहे पण तो दागीने आणि शानशौकी साठी विनिमय करायचा स्वच्छतेच्या बबतीत सगळीच बोंब .. काचेपल्याडचे जग ते बघताना त्यांचा दृष्टिकोन खुप वेगळा असतो.. का? शिक्षणाचा अभाव... संस्कार या गोष्टीकारणीभूत आहेत का याला... आणि या सारख्या बर्‍याच गोष्टी... पण आपण हा दृष्टिकोन बदलायच्या दिशेने कधी पाउल उचलतो का? नाही ना? मी हा प्रश्न स्वतःला विचारला हेच उत्तर मिळालं. आणी एका गोष्टिची गरज भासली आपलाही दृष्टीकोन बदलायला हवा आता... मला जास्त माहिती नाही पण पुण्यातली एक संस्था आठवली.. जी अशा लोकांसाथी विशेष्तः मुलांसाठी काम करते.. अगदी शौचालयाचा वापर कसा करावा कशी स्वच्छता असावी पासुन आई वडलांचा आदर कसा करावा.. बोलताना भाशा कशी वापरावी पर्यंतचे सगळेच स.स्कार तिकडे केले जातात.. त्या संस्थेत खूप कमी दिवस होते मी पण त्या मुलांमधले बदल आणी त्यॉहे विचार बघुन एकच जाणवल काचेवरची धुळ पुसतायेत ती मुलं आणी बाहेर येण्याचा प्रामाणीक प्रयत्नही करतायेत..
अशी कुठलीच संस्था धारावी साठी नाही? किंवा तमाम भारतातल्या झोपडपट्ट्यांसाठी नाही? असेलही मग ते कार्य लोकांपर्यंत पोहचु देत ना.. अशा मानसिकतेची माणसं तयार होऊ देत ना... आपल्या इथे माध्यमांना राखी सावंत किती दिवसाचा गणपती बसवते हे जाणून घेण्यात आणि लोकांपर्यंत पोहचवण्यात रस आहे पण आपणही काहीतरी पाऊलं उचलावीत...
काचेपल्याड जग आहे माहीत होत.. पण अशा वेगवेगळ्या काचाही आहेत याची जाणिव नव्हती...दुर्गंधी येतेय येउ द्या.. उघड्या डोळ्याने आणी नव्या दृष्टीने बघा... गाडीच्या आपोआप वर जाणार्‍या काचा तशाच स्तब्ध होतील. निदान माझ्या काचा तरी वर जाणार नाही..

शुक्रवार, २९ ऑगस्ट, २००८

खो खो

सॅम ने खो दिला... या कव्यमय खो खो मद्ये जास्त काही न लिहिता माझ्या आवडत्या कविता लिहितेयं.
पहिली कविता... ही मी शाळेत केव्हातरी वाचली होती तेव्हा पासुन आवडते. बहिणाबाईंच जास्त काही वाचल नाही.. पण ही कविता वाचुन फ़ार अप्रुप वाटल होत...


मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं ते तंतर
अरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर

मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगु मात
आता व्हत भुईवर
गेलं गेलं आभायात

मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना
केवढं केवढं
आभायांत बी मायेना

देवा आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं


... बहिणाबई



ही कविता ग्रेस यांची... खूप खूप भावलेली...



पांधर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या

पांढर्‍या शुब्र हत्तींनी मग दोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजा खाली अस्तींचे झुंबर फुटले

पांढरे शुभ्र हत्ती , अंधारबनातून गेले,
ते जिथे थांबले होते, ते वृक्षही पांढरे झाले


... ग्रेस


सरते शेवटी सॅम थॅक्स् खो दिल्या बद्दल... आता माझा खो विरेंद्र आणि सौरभला

गुरुवार, २८ ऑगस्ट, २००८

कोशिश

जैसे वे सब को देती है
वैसे उसने मुझे भी गम दिये
पर उस हर एक गम के
साथ खुशियों को जिने का
तरीका भी बताया था
अब सब धुंदलासा याद है
वो भी एक जमाना था
हम जी रहे थे वो पल
अब तो सिर्फ़ जिने कोशिष कर रही हु

...स्नेहा

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २००८

होरपळ

आता तुझ्याशिवाय जगयाची सवय झाली गं
पण मग तुझी आठवण मधुनच का छळते?
धावपळीत नाही जाणवत कधी
पण एकांतात
तुझ्या चितेची आस
मला अजुनही आत कुठेतरी जाळते..
ती अग्नी अजुन शमलीच नाही
आसवांना तिला विझवण अजुन जमलच नाही
आता आसवेही आटली आहेत
कदाचित त्या चितेनेच त्यांना
आपलस केल असाव...
माझ्यातल बरच काही तिच्या सोबत जळुन गेल
आता उरलिये ती फक्त त्या चितेची धगधगती आग
आणि त्याच्या भोवती घुटमळणारी माझ्यातलीच मी...
...स्नेहा

शुक्रवार, २५ जुलै, २००८

एक झाड ... उन्मळलेलं

आठवतेय ते झाड? त्याचा प्रवास? तुला कसा आठवेन म्हणा? उन्मळुन पडलेल ते झाड... कुठल्याश्या प्रवाहात वाहत होत... त्याची जमीन त्याची माती सगळ सगळ सुटल होत... मग एक दिवस एका नविन पण आपल्याश्या जमिनीत ते परत रुजण्याचा प्रयत्न करु लागल.. मातीही आपलीच वाटत होती त्याला.. मायेचा ओलावा होता त्या मातित.. आईचा स्पर्श होता त्या मातीत.. ती माती जमिन..सामावुन घेत होती त्या झाडाला.. ते झाड परत जगु लागल.. बहरु लागलं... पण कोणाची नजर लागली कोणास ठाउक त्या मातीने हिसकाउन दिल ते झाड... त्या जमिनीने उचकटुन टाकल त्या झाडाला स्वत:ह पासुन... परत कोल्मडल ते बिचार... पण आताशा त्याला सवय झाली होती या सगळ्याची... त्याच्या मूळाशी मुठभर माती शिल्लक होती.. आता जगण्यासाठी तेवढीही माती पुरे ... नुसते श्वास तर घ्यायचेय.. हे झाड जरा निराळच.. आता त्या मुठ दोन मुठ मातीसह बहरतय.. कोलमडल म्हणुन काय झाल.. जगण्याचा प्रयत्न तर करतय... ती जमिन अन माती अशी का वागली.. कदाचित चुकी झाडाचीच असावी.. करण काहिही झाल तरी जमिनही परकीच होती नाही का? पण कोणास ठाउक झाडाचा त्या मातीवर त्या जमिनीवर खुप विश्वास आहे.. कदाचित उन्मळलेल झाड परत उभ राहिलही.. झाडाचा त्या मातीवरचा विश्वास अजुन बहरवतोय झाडाला..

मंगळवार, २२ जुलै, २००८

....

अबोला.. कधी कोणी स्वतःशी अबोला धरलाय?

वेड लागलय का तुला अस कोण करत का?

मग आपण का अस वागतो अबोला धरल्यासारखे?

..... निरुत्तर
हं सगळ जगावेगळ करण्याची हौस ना आपल्याला...

तु गप्प बसशिल का जरा... मला शांत बसायचय...

का पण ह्याला काय म्हणायच? कोण स्वतःशी करत नाही असा आडमुठेपणा मग..?

हे बघऽऽऽऽ जाऊ देत चल आपण काहीतरी वाचायला घेऊ
................


मला एक प्रश्न पडलाय?

आता कोणता?

बघ ना अस म्हणतात प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसत म्हणे..जर अस असेलच तर त्याला प्रश्न का म्हणाव?

कोण म्हणत प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाही म्हणुन.. असतात उत्तरं.. मग काही प्रश्नांची उत्तर का सापडत नाहीत?

मुर्ख ती असतात सापडत बसायची गरज नाही.. उत्तर आपोआप मिळतात.. काही प्रश्नांची उत्तर काळ ठरवतो...

काळ.. ????
हम्म

हा काळ काही वेळेला योग्य वेळी नाही येत त्याच काय?

वेळ योग्य की अयोग्य हे आपण ठरवत नाही आपली कर्म ठरवितात....

बापरे काय झाल तुला एक्दम कर्म वैगेरे? ही ही हीऽऽऽऽ बर बर जर ही कर्म ठरवितात तर मग कधी कधी आपण काहीच केल नसत मग आपण न केलेल्या चुकांची शिक्षा आपण का भोगायची?

परिस्थीतीशी झगडायच आश्यावेळी.. नाही भोगायच..

पण काही वेळा पर्याय नाही उरत झगडायला त्या वेळेस?

मग त्या वेळी मुकाट्याने सहन करायच.. पर्याय नसतो ना? सहन करायच आणी आपल्या वेळेची वाट बघायची .....

आपली वेळ?

ह्म्म स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेउन आपल्या योग्य वेळेची वाट बघायची in btw आपले कर्म करत राहायचे..

बापरे आपण फ़ार जड बोलायला लागलो... चला पुस्तकच वाचुयात.

गुरुवार, १० जुलै, २००८

पेहेचान..

आयिने में तसवीर देखते हुवे
सिर्फ़ तसल्ली रेहेती है
धुंदलासा चेहेरा देखते हुए
ऐहसास होता है
चलो ये तो नही बदला
वैसे तो काफ़ी कुछ बदल चुका है
सिर्फ़ हम ही नही काफ़ी कुछ बदल गया है
अब मेरे गली के चोहराये भी
नही पेहेचानते मुझे
में ही पेहचान ढुंडती हु
शायद कोई मुस्कुराभी दे?
पर अफ़सोस...
वैसे तो काफ़ी कुछ बदल चुका है
घर भी अजनबियोसा बर्ताव करता है
धुल की चद्दर ओढे बैठा है
सब कुछ वैसा ही है
फ़िर भी बदला बदलासा लगता है
दिन के आख़ीर में थक जाता है मन
मायुसी छा जाती है सभी ऑर..
तब घर का आईना
मेरे साथ आसु बहाता है..
चलो ये तो नही बदला...

...स्नेहा

बुधवार, २५ जून, २००८

मरणाचा सोहळा

खुप प्रयत्न केला तरी आपण काही गोष्टी टाळू नाही शकत... हे पोस्ट मला आठवड्यापुर्वीच टाकायच होत पण नको म्हणुन थांबवल स्वतःला.. पण काही करुन मनातुन हा विषय जात नाही.. नुसत आठवल तरी तळपायाची आग मस्तकाला जाते... इथे काहीतरी खरडुन शांतता मिळेल अस नाही..पण.. माहीत नाही इथे मोख़ल करावस वाटतय...नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सकाळी ऑफिसला गेले.. काही वेळाने एका माणसाने सांगितल की काल मॅडमची आई गेली... जास्त वाईट वाटायच कारण नव्हत त्यांच वय खूप झाल होत .. म्हणुन नेहमी प्रमाणे गोराई प्रवासला सुरुवात .. प्रवासात गप्पा गाणी बडबड सगळ नेहमी सारख चालु झाल... परत ऑफिस मध्ये येई पर्यंत डोक्यात मॅडम त्यांची आई हे विषय पुसुन गेले होते... दिवसाला सुरुवात झाली नेहमी प्रमाणे.. मग क्लेयरने सांगितल की आपल्याला चर्च मद्ये जायच आहे दुपारी.. आणी दुपारी आम्हा सगळ्यांची स्वारी दादरकडे निघाली... निघण्या पुर्वी सगळ्या स्टाफला येण्याच विचारण्याच काम माझ्या कडे सोपविण्यात आल होत.. तिथे पहिला आश्चर्याचा धक्का बसला... माणसं अशीही असु शकतात अस वाटुन गेल... एका शिक्षिकेला विचारल तु येणार का? तेव्हा तिने प्रति प्रश्न केला कोण कोण येणार... तिथपर्यत ठिक होत पण ती येणारहि नव्हती पण दुसर्‍या वर्गातल्या शिक्षिका येणार तर सरांच्या नजरेत आपण येउ मग आपल्य नोकरीला धक्का आहे वैगेरे विचार ती मांडत होती मला तिचा रागच आल होत.. मि सरळ तिला म्हणाले मनात नाही तर येऊ नकोस तिथे कोण आल आणी कोण नाही हे बघत बसायल कोणालाच वेळ नसेल आणी कोणी त्या मनस्थितीतही नसतील...(खुप पल्हाळ लावतेय पण ही घटना महत्वाची आहे) आणी आम्ही दादरला निघालो.. माला त्या दिवशी काय झाल होत माहित नाही.. मि अशी कोणाला तरी भेटायला चालले आहे तरी मस्त मज्जा मस्ती चालु होती संपुर्ण प्रवासात... नंतर गाडी ददर मद्ये शिरली आणी एका घरा समोर उभी राहीली तशी मी अचानक शांत झाले आणी मला परिस्थितीच भान आल... वर त्या आजींचा म्रुतदेह होता त्याच अंतिम दर्शन घ्यायला अम्ही आलो होतो... सगळे वर गेले.. मला अशा ठिकाणी जायला खरच नकोस होत... पण मीही धिर धरुन वर गेले.. खाली येताना खुप हळवी झाले होते आज परत एका मुलीने तिच्या आईला गमवल याची जाणीव होऊन मन हळव झाल होत.. खाली उतरले तर जिन्याच्या बाहेरच सर आणी आमच्या ऑफिसचा स्टाफ हसत आणी खिदळत उभे होते.. हा दुसरा धका..त्या नंतर आम्ही चर्चमध्ये गेलो... माझ मन सुन्न झाल होत... चर्च मध्ये ५०० लोक होती.. पण ती फक्त गर्दी होती शाळेत त्या शिक्षिकेला जी भिती वाटली होती त्या भिती पोटीच ही माणस जमा झाली होती... माझा जिव तिकडे गुदमरत होता... त्यांच्या प्रार्थना सुरु झाल्या.. माझ्या ऑफिस मधल्या एका महामयेने मला त्या वातावरणात दात काढत विचारल तुझे विचारल स्नेहा जमता तुझे जमता है ना इनके जैसा उठक बैठक करना ही ही ही... मला त्या क्षणी तिच्या कानाखाली जाळ काढण्याची इतकी इच्छा झाली होती.. कारण ती बाई मैतीला आलो आहोत अस विसरुन फ्युनरल पार्टीला आली आही आशा आर्विभावात वागत होती... नंतर फक्त तिच तस वागत नाही हे समजाल आणी माझ्या चहुकडे माणुस या नावाखाली वावर्णारे कुठलेसे विक्षिप्त नालायक आणी भावनाशुन्य प्राणी आहे हे जाणवल.. पण उशिर झाला होता प्रार्थना सुरु झाल्या होत्या आणी मी जरा आतल्या बाजुस उभी असल्या मुळे मला निघताही येत नव्हत... दोक्यात प्रचंड चिड राग दुःख सगळ एकत्र झाल आणी दोळ्यातल पाणी मी थांबवु नाही शकले... तिथे उभ राहण अशक्य होत पण पर्याय नव्हता... माझी नजार राहुन राहुन मॅडम कडे जात होती... किती संयम आहे त्यांच्याय वयाने इतका संयम येत असावा... ह्या बाईने आज आइला हरवल पण जास्त रडारड नाही.. त्यांच्य पध्द्ती आणी रुढी प्रमाणे सगळे सोपस्कार करत होत्या.. मला हेवाच वाटला त्यांचा... खुप आदर वाढला.. पण....त्या दिवशी देवाच्या मनात काय होत कोण जाणे ? चर्च नंतर आम्ही स्मशानात गेलो.. माझ्या मनात काय काहुर माजल होत मलाच माहित... पाय आणि मन सुन्न सगळच झाल होत... तिकडच द्रुश्य बघुन तर ... काय कराव कळेना.. खुप शिव्या घालाव्याश्यासुटलो वाटत होत्या सगळ्यांना... मेलेल्याच्या टाळुवरच लोणी खाणारे होते सगले.. दोन थडग्यांच्या मध्ये चालायला वाट केलेली असते हे विसरुन लोक थडग्यांवरुन पाय देत पुढे जात होती.. काही जण चक्क धडग्यावर उभे राहुन मरण सोहळा बघत होते... मला सगळ अनावर होत होत... मी त्या गर्दीचा एक भाग आहे ही भावना ...शब्द नाही सापदत मला... शेवटी तोही विधी संपला.. वाटल त्या आजी मॅडम आणी मी तिघेही एकदाचे सुटलो... म्हणजे या मरण सोहळ्याच्या अंकाचा इथे शेवट झाला... या लोकांमध्ये त्या खड्यात माती टाकायची पध्दत आहे मी तिथपर्यन्त जाण टाळल... तर आमच्या क्लेयर बाईंना काय हुक्की आली कोण जाणे तिला वाटल मी सगळ्याला घाबरतेय की काय.. म्हणे चल आपण दोघी जाऊन माती टाकु... ती ते अश्या पध्दतीत बोलली जस ..जाऊ देत... तिच्या साठीही तो सोहळाच होता हसण खिदळन..सगळच तिठली लोक सहज करत होते... अम्हि निघालो.. तिथला एक एक क्षण इतका जड जात होता.. मी डोळे मिटल्यावर मला माझी आई दिसत होती.. माझ मन माझ्या बाबांच्या कुशीत धाव घेत होते... पण त्यतल सगळ्च अशक्य होत आहे.. हि जाणिव होत होती.. माझा घराकडे प्रवास सुरु झाला... मध्ये मैत्रिणिकडे ही चिड चिड बोलुन झाली.. डोळ्यासमोर सतत मॅडम त्यांच्या डोळ्यातुन आलेले ते आष्रु .. माझी आई आणी...ऑफिस मधल्या मैत्रिणि बरोबर बोलताना हा विषय निघाल मला तिने विचारल काल तुझ्या डोळ्यात पाणी का होत... मि उत्तर दिल एक मुलगी पोरकी झाली म्हणुन.. तिल एवढच झेपण्यासारख होत... तर तिच उत्तर ऐकुन सगळ्यत मोठा धक्क बसला... तिच्या निरिक्षणाला दाद दिली पाहिजे... ति म्हणाली स्नेहा उधर सबसे दुखी सिर्फ़ तुही लग रही थी .. ओर तु किस बेटी की बात कर रही है? तुने देखा नही वो सिल्क की अच्छीखासी प्रेस की हुयी साडी ऑर लिप्स्टिक लगाये हुवे आयी थी उसकीही मॉ के फ़्युनरल पर... तु ना पागल है ज्यादा सोचती है...छोड॥
मी निशब्द्च होते...

एक अजुन निर्लज्ज गोष्त म्हणजे या मरण सोहळ्याचे फोटो काढले जात होते

बुधवार, १८ जून, २००८

अघळपघळ

ह्म्म्म आजकाल माझ्यात मस्त बदल झालाय अस जाणवायला लागल आहे... (आधिच्या पोस्टवर जाऊ नका ते वर्षापुर्वी लिहलेल होत अत्ता पोस्ट केल ईतकच आणी हो ते काल्पनिक समजा) तर काय म्हणत होते ..माझ्यात झक्कस बदल झालाय... बदल नाही म्हणता येणार त्याला कारण मी अशीच होते आधी मध्ये काय फेफ़रं भरल होत कुणास ठाउक? माझा बंद पडलेला रेडिओ अर्थात तोंडाचा मस्त सुरु झालाय... आणी आमच FM चॅनलही मस्त फेमस झालय... ऑफिसात गप्प गप्प बसणारी मी आता धिंगाणा घालताना बघुन लोकं आश्चर्य व्यक्त करत होती... सगळ्यात लहान असल्या कारणाने स्नेहाच स्नेहा बच्चा कधी झाल कळलच नाही त्यांनाही अन मलाही... एकुणच धम्माल चालु आहे... गम्मत म्हणजे मी आजकाल माझी टेन्शस का काय म्हणतात तेही मस्त एन्जॉय करू लागलेय.. कस माहीत नाही पण करतेय हे नक्की... मध्येच चिडचिड होण साहजिक आहे पण त्रासलेली अज्जिबात नसते... सध्या हसा आणी हसु द्या अस धोरण सुरु केलंय.. ऑफिसात बरेच वाद विवाद आणी सगळ्याच ऑफिस मध्ये असत तस रादर जरा जास्तच राजकारण चालु होत आहे...मला हे एक कळल लोक ऑफ़िस मध्ये येऊन कामापेक्षा राजकारण जास्त खेळतात, हेच परिश्रम आणी डोकी कामात वापरली तर... असो पण माझ्यावर कुठलाच परिणाम जाणवत नाही हे आहो आश्चर्यम आहे... कारण बर्‍याचदा लोक मलाच मोहरा म्हणुन वापरण्याच्या प्रयत्नात असतात... पण मी दगड झाले का काय ठाउक नाही पण चक्क र्दुलक्ष करायला शिकलेय... जो दुश्मन है उनको भी हसाते है आजकल हम...त्यात दुधात साखर म्हणजे चिल्लु पिल्लु लोकांची शाळा सुरु झाली आहे... वर्गात जायचं आणी मज्जा करायची... त्यात काल शाळेचा पहिला दिवस होता... सगळ्या बाई लोकांना खुप काळजी वाटत होती.. की आज फक्त रडण ऐकाव लागणार.. पण अगदी तसच झाल अस नाही... त्या लोकांनी हसणार्‍या आणी खेळकर मुलांची जवाबदारी मस्त पार पाडली आणी रोंदुलाल डिपार्ट्मेन्ट आमच्या कडे नकळत सोपविण्यात आल... हम भी कुच कम नही सगळ्यात भयानक म्हणजे भोकाड पसरवण म्हणजे नक्की काय याची प्रचिती होत होती अशी दोन मुल जरा आवघड होती बस... त्यातला मुलगा नर्सरी मधला आणी एक ज्युनियर केजी मधला... या दोन केस सोडुन बाकी दाये हात का मल का काय म्हणतात तस होत... नर्सरीतल आमच कार्टुन... आदित्य नाव त्याच... इतका जोरात भोकाड पसरवल होत त्याने आणी त्याला कोणी धरलच तर त्याचे हातपाय जोरात लागायचे इतकच... त्याला मी उचलुन घेतल आणी पंधरा मिनिट शांत करण्याचा प्रयन करत होते... एक तर त्याची भाषा कोणती हे कळात नव्हत आणी त्या बिचार्याला इंग्रजी भाषा आवगत नव्हती... मग मी त्याच रडण कान देउन ऐकल... तर कळाल अरे हा तर मराठीत रडतोय... हुश्श झाल ... पाच मी त्याला समजावयाच म्हणुन विचारल आरे बाला तु शहाणा की नाही.. तर भोकाड पसरत नाहि मी वेडाssss मनात म्हटल चला आपल्याच जातीचा दिसतोय... कस बस पाच मिनिटात शांत केल .. आणी साहेब काही झालच नाही मला खुप मज्जा येतेय आशा आविर्भावात खेळायलाही लागले... त्याच्या वर्गातली शिक्षिका आणी त्याला सांभाळायचा प्रयत्न केलेले सगळे मला... 'कीती पराक्रमी ही' या नजरेतुन बघत होते... ;) केस नंबर दोन ज्युनियर केगी... त्या वर्गाकडे मी मोर्चा वळवला तिथे गेला एक तास ते कर्ट रडत होत याच नाव आर्या बर याच्या भाषेची कल्पना आधिच आलेली त्या मुले काय कराव सुचत नव्हत... तो तमिळ का मल्लु होता पण सुदैवाने त्याला आणी मला तोडक मोडक इंग्रजी येत होत.. पण साहेब ऐकतायेत कसले... याच चार जणांना बडवुन झाल होत.. आणी त्याच्या मात्रुभाशेत रडण चालु होत... आणी ती भाषा कोणालाच अवगत नसल्याने सगळ्यांच्या नाकी नौउ आले होते... शेवटी धिर करुन त्याला उचलुन घेतल.. आणी मला वाटल त्याची आता माझ्यावर वार होणार तर उलट झाल त्या पिल्लाला काय वाटल कुणास ठाउक मला बिलगल आणी मुसमुसुन रडु लागल.. मला काही सुचेना... मी त्याला काहीही न बोलता फक्त कुरवाळत राहीले आणी तो मला बिलगून बसला होता... हळु हळु त्याच मुसमुसण थांबल आणी इतर मुलांप्रंआने त्याच लक्ष ति.व्हि कडे गेल मग माझ्या कडेबघुन गोड हसला... माझ्या मांडिवर आसनस्थ होउन महाराज कार्टुन बघू लागले.. त्याच्या वर्गातल्या त्याच्या बाईंना गदगदुन आल.. केवढे हे उपकार... हे भाव तिच्या डोळ्यात दिसत होते...असो अजुनही काही गमती जमती आहेत... पण तुम्हाला पकवायच नाही... अघळपघाळ लिहीत गेलेय... आजुनही लिहावस वाटतय पण थांबवतेय॥ माझ प्रेमात न पडता '' आज़कल पॉव जमी पर नही पडते मेरे '' अस झालय॥

गुरुवार, १२ जून, २००८

एक भिजरी आठवण

पाऊस! पावसाच्या सरिंसोबत कित्येक आठवणी सुध्दा भिजतात ना? जणु प्रत्येक पावसाबरोबर त्याच्या सरींसोबत प्रत्येक आठवणी ओल्या होतात.. त्या कधी हसर्‍या असतात तर कधी नुसत्याच ओल्या...लहानपणी मज्जा म्हणुन डबक्यात मारलेल्या उड्या.. अन मग पाठुन बसलेले आईचे धपाटे ... आनि मोठेपणी जाणुन बुजुन व्हिनचिटर विसरुन मुदाम पाससात भिजणं अगदि रोजचच.. मग आईसाहेबांच्या बोलण्या... कशाचीच मुभा न राखता मनसोक्त भिजत रहायचं...प्रत्येक थेंबाबरोबर नवी आठवण अन मग पावसाची नि त्या आठवणींची चढाओढ.. मग कळत्रच नाही की आपण त्या आठवणींमध्ये जास्त भिजतो का त्या पावसात? साराच खुळा खेळ पण हवाहवासा.. कधी ते आठवणींचे क्षण पावसाशिवाय भिजवतात..तर कधी पवसासकट...तो पाऊसही तसाच आठवतो. तो गार वारा.. वेगाने येणार्‍या सरी.. मातीचा सुगंध.. मग माझ मलाच विसरुन त्या पावसाच्या सरि झेलणं .. नुसतच भिजत राहण... तशी मी वेडीच आहे पावसाकरिता.. पावसाच येण म्हणजे माझ भान हरपुन पावसाचचं होण... सगळ जग विसरुन जाऊन मन बागडु लागत.. त्या वेळेस मनाच वयं विचारायच नसतं.. सगळ्या सिमा रेषा ओलांडुन ते पावसाशी एक्रुप होत.. गाणं गुणगुणनं.. गिरकी घेण.. सगळ माझ्याही नकळत होत उरतो तो फ़क्त पाऊस अन मी (?)... त्या दिवशिही तसच झाल.. मी एकटीच होते पावसासोबत... आजुबाजुला कुणीच नाही.. त्या मुळे माझा अन पावसाचा जणु मुक संवाद चालु झाला.. त्याची प्रत्येक सर झेलण्याचा माझा खुळा प्रयत्न सुरु होता.. मी अन तो गुणगुणतच होतो... हाताच तळ करुन पावसाला साठवत होते मी.. मध्येच एखादी गिरकी घेत होते... एकुणच सगळा वेडा प्रकार (जगाच्या द्रुष्टीने) सुरु होता.. मी हरवुन गेले होते पावसात तित्क्यात तो आला.. माझ्या नकळत.. कठड्याला टेकुन उभा रहिला.. माझ्या कडे बघतच... मला कळलच नव्हत त्याच येण.. मी मनसोक्त भिजत होते आणि तो फ़क्त माझ्याकडेच बघत होता... एखाद्या कादबरीत किंवा पिक्च्र मद्ये घडाव तसा प्रसंग होता.. मी एक गिरकी घेता घेता माझ लक्ष त्याच्या कडे गेलं.. तो तसाच उभा होता माझ्याकडे टक लावुन... क्षणभर मला काही सुचलच नाही ... आणी चक्क चक्क मी लाजले (?) माझ मलाच आश्चर्य वाटल की मी लाजु शकते?.. असो त्याला भानावर आणत आणी मुख्य म्हणजे मी स्वतः भानावर यायला क्षण दोन क्षण तरि गेलेच असतील... संभाषणाला सुरुवात करावी म्हणुन मी विचारल, '' येतोस भिजायला?'' नंतर लगेचच दाताखाली जिभ गेली आणी स्वतःशीच पुटपुटले काय विचारल हे? तो नुसताच हसला.. मानेनेच नकार देत कोरदा चिट्ट तो म्हणाला अताच भिजलो... दोन मिनिटे मला कळलच नाही तो काय म्हणाला ते आणी जेव्हा समजल तेव्हा सुचलच नाही काय कराव ते... भिजलेली मी अन माझ मन पावसाच्या सरींमद्ये जास्त भिजलो का त्याच्या शब्दामद्ये कळलच नाही....
...स्नेहा

सोमवार, ५ मे, २००८

कच्च गणित

गणित... माणसाच आणि गणिताच नात अजबच आहे... नावडता विषय तो.. क्वचित कुणाला अवडतोही... पण आवडो न आवडो आयुष्याच गणित सगळेच मांडतात ना? कोण आलं कोण गेलं? कोणी किती केल किती नाही? किती मित्र किती शत्रू ? कोण किती आपल किती परकं? याहून निरनिराळी गणित असतात... मी तशी कच्चीच आहे गणितात... त्यामुळे ही कदाचित अनुभवलेली गणित लक्षात राहिली असावी... पण नाही सहन होत हा व्यापार... निरपेक्ष कोणालाच जगता येत नाही आणी कोणी जगत असेल तर ते जगाला मान्य नाही का ? बहुदा इथेही व्यवहारच निरपेक्ष जगल की बाकी शुन्य येते... पण सगळ्यांना बाकी शिल्लक हवी असते...थकते मी या सगळ्याला... नको ते गणित नको त्या आयुष्याच्या बेरजा वजाबाक्या... सरतेशेवटी हाती शुन्यच लागणार.. का माझीही काहीतरी बाकी उरणार?आता मलाच कळत नाही मला बाकी हवी का शुन्य? जगासारखं गणित पक्क नाही इतकच उमगतय.. मला मिसळुन जायला आवडत ...जमतही ... पण इथे प्रत्येक आकडा वेगळाच... मग मी बेरजा करत सुटते झालाच तर गुणाकार... पण समोरचा भागाकार करत असतो... आणि नेमकी त्याला बाकी शुन्यही नको असते... अपुरं जगायच.. अस अपुर जगण्याची सवय सगळ्यांनाच झाली आहे.. आवडतही ते सगळ्यांना... सोयीच वागणं ते... सोयीनेच ठरवतात सगळे भागाकार... गुणाकार... बेरिज की फक्त वजाबाकीच.... छे माझं गणितch कच्च ...

...स्नेहा

बुधवार, ३० एप्रिल, २००८

ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...

ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...
तो धावत होता
पण हाती येण्यासाठीच
पण कधीतरी चुकतोच अंदाज
मग खुप दुर होत जात अंतर
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

कधी येतो तो हातात
मग राज्यही तोच घेतो
आपण धावतो अन तो पकडायला येतो
मग जणुन बुजुन आपण त्याच्या हाती लागतो
मह्णतो आपण बास आता
शांत बसु या... पण हट
कळाला अन कदाचित त्यालाही हे मान्य नसत
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

कितीही धावल तरी
लवकर हाती सापडतच नाही
मग दमतो आपण..
तो मात्र दमत नाही
धावत सुटतो दुर दुर
आपनही पळत असतोच
पण त्याचा वेग आता वाढत जातो
तो आपल्याला विसरुन
दुसर्‍याच डाव खेळु लागतो
आपण मात्र.....
ऐ ऐ ऐ... पकड पकड पकड...
शिट हुकला...

...स्नेहा

बुधवार, २३ एप्रिल, २००८

कागज़ के फ़ुल ..

कागज़ के फ़ुल ..
कागज़ के फ़ुल आज़कल मेहेंगे हो गये है
असली फ़ुल तो फ़िर भी मुस्कुराते है
पर उस मुस्कान के पिछे
कुछ दर्दसा छुपा है जैसे
कागज़ के फ़ुल आज़कल मेहेंगे हो गये है..

सब अपने हिसाबसे जिते है इधर
हसते है बोलते है कभी चुप से होते है
अपनेही मर्जी के मालीक..
असली फ़ुल मुरझा जाते है
फ़िर बदलने पडते है
कागज़ के फुलो का अच्छा है
मुरझाते भी नही
दिखते भी सुंदर है
रही बात खुषबु की..
उतना तो एगजेस्ट होता है भाई
वैसे तो आज कल खुशबु भी
बाजारो में मिलती है
कागज़ के फ़ुल आज़कल मेहेंगे हो गये है
कागज़ के फ़ुल ॥

...स्नेहा

नुसतीच साद..

साद घालतेय मी
कुणीच दाद देत नाही
सादही मुकीच माझी
मनातुन दिलेली फक्त
कदाचित कुणाच्याच
अंतरापर्यंत न पोहचणारी
तरिही साद घालतेय मी...

शब्दांसह बोललं
तरीही नेमका भावार्थ
पोहचत नाहीच..
मग शब्दच खोटे वाटतात
कागदी फुलांसारखे...
पण शब्दांना तरी का दोष द्यायचा?
समोरच्याला ते ऐकायचच नसत
ते बहुदा त्यांना हव तेच ऐकतात..
नाहीतर फ़क्त गैरसमज होतात...
नुसतीच साद घालतेय मी .......

...स्नेहा

गुरुवार, १० एप्रिल, २००८

आजकाल...

आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास..
समोर येईल ते मुकट्याने जगण
मी खरचं का कधी अशी होते?
उंच उडण्याची माझी इच्छा
माझ आभाळ.. माझ नवं क्षितिज..
सगळच शोधतेय मी..
कुठे आहे सारं?
आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)
काय आहे हे नेमकं?
याला जगणं नक्कीच नाही म्हणत..
कुठे आहेत त्या भावना ते माझे शब्द?
सगळच काळाआड दडलयं
का माझ्या मागे लपलयं?
आजकाल फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)
मला नाही जगवत आश्याने
पावल मागे वळवताही येत नाही
पंखातल बळ चक्क गेल्यासारख वाटतंय
झेप घेण्या आगोदरच
आभाळ माझ फाटलंय...

आता फ़क्त चालु आहेत ते नुसतेच श्वास.. (?)

...स्नेहा

आभाळ माझ फाटलंय... या ओळीच श्रेय विरेन्द्रला जात बरं का?



मंगळवार, १ एप्रिल, २००८

भरकटं... एक उनाड दिवस

आज मला फ़क्त मोकळ व्हायला लिहायचयं... (नेमकी गोची कुठे होते माहित आहे का? माझ नाव चक्क इथे दिसत.. म्हाणजे कधी कधी वाटत टोपन नावाने जर ब्लॉग सुरु केला असता तर काय बिघडल असत? मग अश्या वेळी जास्वंदी आणी संवादिनी सारख्या लोकांचा हेवा वाटतो असो) तरीही आज मी मोकळेपणाने आणी काहीही विषयावर म्हणुन लिहणार नाही.. केवळ मुक्तछंद... मला नेमकं काय लिहायच आहे माहित नाही पण लिहायच आहे काहितरी... विचित्र मनस्थिती आहे ना ही... म्हणजे खुप साठलय नेमक कशावर लिहु कळत नाही....मी ना आज काल जरा विचित्र वागायला लागले आहे.. म्हणजे अस काही करते जी ते केल्यावर 'मी'अस केल? असा प्रश्न मलाच चकीत करुन जातो.. आता परवाच बघा ना? रविवारचा दिवस.. हॉस्टेल मधुन घरी जायची इच्छा नव्हती (हे घरच्यांनी कोणी वाचल तर माझी वाट लागेल इतक नक्की) तर मला घरी कोणाकडे जावस वाटत नव्हत... होस्टेलवर नुसत बसुन राहण स्वभावात नाही.. नक्की करु तरी काय? हे असे प्रश्न पुर्वी मला कधी पडले नव्हते कारण मुळात मी उद्योगी पण मी कधी काळी खुप उद्योगी होते हे अत्ताच्या मला बघुन कोणी म्हणनार नाही हे नक्की... (मी वाहवत चालले आहे ना?) हं तर मी शेवटी रविवारी पहाटे १० ला उठले... परत काय करायचा हा मोठा प्रश्न आ वासुन उभा होता जणु... पटापट आवरल आणी दादरचं प्लाझा गाठलं... एकटीने पिक्चर बघायची ही माझी पहिलीच वेळ... पण आमच्या प्रिय मित्रांपैकी बर्‍याच जणांना माझी दया वाटायची की मी केवळ ते दुर आहेत आणी कोणाची सोबत नाही म्हणुन सिनेमे बघत नाही... :( पण मग त्यांचेच उद्देश एकटी जायच सरळ... मग शेवटी मीही धाडस केल... आणी वळुच तिकीट काढल... थेटरमध्ये शिरताना द्विधा मनस्थिती होती... येस आपण एकटे आलो.... लोक शेजारी बरी मिळु दे रे देवा...पण मग काहीच वाटल नाही एकदा तो सिनेमा सुरु झाला की माझ कुठे लक्ष जात कोणाकडे? मद्यांतरात दोन सामोसे आणी एक कॉफ़ी एकटीनेच मट्टम केली.. पिक्चर संपला आवडला..पण लोकांना आवडला इतका नाही.. ते जाऊ देत.. तर बाहेर पडले आता पुढे काय हा प्रश्न परत दत्त म्हणुन आमच्या समोर उभा... तर मी परत मला आहो आश्चर्यम वाटेल अस काम केल... त्याच थेटर मध्ये रेस लागला होता बघण्याची विषेश अशी इच्छा नव्हती तरीही लायनीत उभी राहीले... आणी तिथे एक मुलगी स्मित हास्य देत आली ''मेरे लिये दो तिकिट्स निकालोगी प्लिझ...'' म्हणाली असही आम्हाला कोणाला नाही म्हणता येत नाही आणी म्हटल बर आहे कोणी टवाळ पोर नको शेजारी त्या पेक्षा हिच बरी म्हणुन तिन तिकिट्स काढली तिच्या हातात दोन सोपविली आणी मी माझ्या वाटेला जाणार तितक्यात तिने तिच्या मित्राची ओळख करुन दिली.. मी विषेश रस नाही दाखवला करण मी स्वतःची कंपनी एनजॉय करत होते.. पण ती दोघे कदाचित जरा जास्तच चांगली होती... त्यांना बिचार्‍यांना मझा एकटेपणा बघवला नाही आणी झाल त्यांची बडबड सुरु.. माझ्यातल पुणेरी मन खर तर जाग होत होत पण मी आडवल.. मग जवळ जवळ जबरदस्तीनेच मला शेजारच्या हॉटेलात नेण्यात आलं आणी मला न विचारता पेप्सी मागविण्यात आल... डोक खरतर फ़िरत होत पण मी सगळ्याला हसुन सामोरी जात होते का याच उत्तर मलाही माहीत नाही... मला ना समोरच्याला दुखवता येत नाही ते दोघे अनोळखी होते पण असे वागत होते जसे मी त्यांच्या बरोबरच आले आहे.. झाल आश्या प्रकारे आमच्या सुखावर विर्जण पडल (कारण एकटेपणाचा कंटाळा आलेली मी खुप महिन्यांनंतर तो एनजॉय करत होते).. मग काय त्यांच्या सोबतच परत आमची स्वारी थेटरात... एकदाचा पिक्चर सुरु झाला.. आणी त्या निशा नामक मुलीची टकळीही तिही हिंदीत.. मला नं नाटक सिनेमा या मध्ये कोणी बडबड केली की डोक्यात जाते .. सांगावस वाटत की आपण तो तास नंतर ठेउ ... मग शेवटी मी तिला सांगीतल बाई सिनेमा कसाही असो पण मला तो सहन करता येतो पण शेजारच्यांची बडबड नाही... अर्थात अगदी अस नाही सांगीतल.. आणी खरच तो सिनेमा पाहण्याचा निर्णय घेण्याची दुर्बुद्धी आम्हांस कुठुन सुचली असे वाटुन गेले.. इतका वाईट होता... झाल एकदाचा संपला सिनेमा... मला टेन्शन आल की हे दोघ आता मला कुठे जाण्यास विचारु नये म्हणजे मिळवल माझ्या डोक्यात आता पुढे काय याच उत्तरही होत...त्यांनी तसा प्रयत्न केला पण तो मी फ़ोल ठरवला... सरळ सांगीतल की मठात जातेय... ते सरळ निघुन गेले मला बाय म्हणुन.. चांगले होते बिचारे.. झाल मग मठात जाउन आल्यावर वेगळाच फ़्रेशनेस जाणवला मग चालत चालत स्टेशन गाढल... आणी परत होस्टेल ... मी गादीवर पडल्या पडल्या स्वतःशी हसले हे अस काही करेल अस स्वप्नात वाटल नव्हत... पण हा दिवस उनाड पणे जगले.. आणी खरच जगले..
[फ़ार पाल्हाळ लावल आहे वाटेल.. पण काहीही विचार न करता लिहीत सुटले होते.. पण इथेही उनाड्पणे लिहल आहे.. जे सुचेल ते :P]

सोमवार, १७ मार्च, २००८

क्लेयर बाईंचे डोहाळे... :)

क्लेयर बाई.... आमच्या ऑफ़िस मध्ये ही परदेशी बाई (बाई मणजे वाचायला आणी ऐकायला ऑड वाटतं माहित आहे पण .. असो मला म्हणायच आहे) तर क्लेयर बाई वय वर्ष ३०-३२ असाव... निळे शार डोळे... आणी गोरा (का पांढरा म्हणावा?) असा रंग वजन म्हणजे आता अजुन जास्त खाल्ल तर फ़ुटेल अस वाटत...इतक... उंची पाच दोन असावी.... अश्या सुंदर तरुणीने एका भारतीय तरुणावर प्रेम केलं ... आणी इंग्रज जरी देश सोडुन निघुन गेले आणी आपला देश स्वातंत्र झाला... तरी त्या बिचार्‍या तरुणाने आपलं पारतंत्र अस ओढवुन घेतल... (अस म्हणतेय कारण तिची मर्जी सांभाळण खरंच कठीण आहे)... अश्या तर्‍हेने क्लेयर बाईंच आगमन भारतात..मुंबईत झालं आता ती आमच्या परदेशीय शाळेमध्ये व्यवस्थापनात आहे... मी जेव्हा तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला जरा दडपणच आल होत.. एक तर तिची भाषा आणी माझ इंग्रजीच ज्ञान.. म्हणजे जरा कठीणच होत.. त्यातुन ती बोलते त्याला आपण फ़ारफ़ार तर पुटपुटण म्हणु... इतक्या हळु आवाजात बोलायची तिला सवय... पण तरीही कसबस मला तिच बोलण समजु लागल...आणी आता आम्ही गप्पाही मारु लागलो... पण मध्येच दोन आठवडे बाई रजेवर ? काळलं नव्हत... मग दोन आठवड्यांनंतर बाई आल्या त्या गुड न्युज घेउन... तशी खबर आम्हाला आधीच मिळाली होती ;) .. पण तिला गोड बातमी सांगीतल्यावर नव्याने आंनद दाखवावा लागला होता... आम्ही डेरी मिल्क देउन त्यांच तोंड गोड केल... त्या नंतर मग मज्जा सुरु झाली ... काय खायच काय खायच नाही... हे मला जेवढ माहीत तेवढ तिला आज्जी बाईंसारख मी सांगीतल....मग झाल बाई रोज विचारु लागल्या काय खाउ ते? पण ह्या इंग्रजांना डोक जरा कमीच या बाबतीत... हा निष्कर्श निघाला.. कारण बाई उलट्या होतात म्हणुन स्प्राइटची अर्धा लिटर बाटली दिवसाला रिकाम्या करु लागल्या.. एकदा असच ती स्प्राईट विकत घेत असताना तिला म्हणाले हे चांगल नाही तुझ्या साठी तर तिने ड्युक्स ची बाटली उचलली याला आता काय म्हणावं ? तिला म्हणाले पी बाई स्प्राइट्च पी... सांगुन तसाही काहीच उपयोग नाही... पलथ्या घड्यावर पाणी... बाईंना डोहाळे कसली तर मॅगडॉनल्ड्चा चॉकलेट मिल्कशेक आणी पनीर सॅल्सा खायचा... चायनीज नुडल्स... आणी देव जाणे अजुन काय ते.... तिला सफ़रचंद व फ़ळ खायला आवडत नाहीत... फ़ास्ट फ़ूड जिव की प्राण... आधीच वाढता वाढता वाढे... एकटा जिव असेल तर ठीक आहे हो... पण...
आता उत्सुकता आहे ते ते कार्टुन कार्ट कसं निघेल याची कारण क्लेयरशी लग्न केल तो केरळचा मल्लु आहे... त्याच वर्णन करण्याची गरज नाही तुम्हाला कल्पना आलीच असेल... :) आता सहा महिन्यांनी काय तो निकाल लागेल... तो पर्यंत क्लेयर बाईंचे डोहाळे पुरवण्याची जवाबदारी ऑफ़ीशीयल नसली तरी ऑफ़ीस मध्ये माझीच... देव करो तिला सुबुध्दी मिळो...

बुधवार, ५ मार्च, २००८

बरस जा बादल...

बरस जा बादल
मेरे ही अंगना...
मुझे पानी पानी होने दे...
आखो से बरसती मेघा
और तुझमे कोइ फ़र्क सा ना रहे...
बरस जा बादल मेरे ही अंगना...
आज मन मे बोहोतसा बोझ है
फ़िर भी मन हलका है
ये अजिब कश्म्कश मे मुझे खोने ना दे
तेरी रुह मे मुझे समेट ले
बरस जा बादल मेरे ही अंगना....
...स्नेहा



पहिल्यांदाच हिंदीत लिहितेय... माहित नाही कशी झाली आहे. तुमच्या प्रतिसादाची उत्सुकता वाटतेय... आणी भितीही... खर सांगा जमली आहे का नाही ते..

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २००८

नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभच नाहि चिरा...नाहि पणती.... वाचल आणी एकदम आठवल...मी १०वीत असतानाची गोष्ट आहे... करगील युध्द सुरु होत॥ शाळेत मग एक उपक्रम म्हुणुन आम्हा सगळ्यांना कोरे टपाल पत्र हातात दिली.. आणी सांगीतल की सैनिकांना पत्र लिहा.. सांगा आम्ही तुम्हाला विसरलो नाहीत... मला खरच नाही महीत इतर मुलींनी काय लिहल काय नाही.. पण मी खुप मनापासुन ते पत्र लिहल होत... नेमक काय लिहल हे नाहि आठवत.. पण लिहीताना डोळ्यात पाणी होत.. झाल.. ते पत्र कारगीलला जाउन पोहोचल... जशी सगळ्याची पत्र पोहचली... मग नंतर काही मुलींना त्या पत्राची उत्तर खुद्द सैनिकांकडुन आली... सगळी उत्तर औपचारीक होती... पण सैनिका कडुन पत्र? पेपरात छापुन सुध्धा आलेल.. मी जराशी हिरमुसले होते कारण माझ्या पत्राला कोणाचच उत्तर नव्हत मिळाल... तशि सगळ्यांना उत्तर नव्हती आली..पण.. तरीही... पण एक दिवस उजाडलाच पोस्टमन काकांनी मी शाळेत जाण्याच्या तयारीत असतानाच ते माझ्या हातात दिल... मला सुचतच नव्हत काय कराव... खुद्द एका सैनीकाने मला पत्र लिहल? काय असेल त्यात...? मग मी हळुवार्पणे ते आंतर्देशीय सैनिकी पत्र फोडल... आणी... पत्र वाचुन खुप भरुन आलेल...माझ पत्र कुण्या आर.के.पठानीया नावाच्या सैनिकाकडे पोहचल होत.. ते जणु माझ्याच पत्राची वाट बघत होते.. कारण ते बॉर्डरवर होते.. आणी पुढे वाचतील न वाचतील या शंकेत... त्यांच्या सख्या बहिणीच नाव होत स्नेहलता.. ते तिच्या पत्राची वाट बघत होते.. त्यांच्या सगळया अप्तिष्टांची पत्र त्यांना मिळाली होती फ़क्त बहिणीनेच पत्र पाठवल नव्हत आणी त्यांची ती लाडकी बहिण... पण ज्या वेळेस त्यांच्या हातात माझ पत्र पडल... त्यांना खुप समाधान मिळाल.. ते म्हणाले स्नेहा और स्नेहलता क्या फ़रक पडता है? त्यांनी त्या पत्रात बरच काही लिहल होत... पण सगळ्यातुन एकच जानवत होत ते म्हणजे त्यांना त्यांच्या बहिणीच पत्र मिळल याच समाधान.. मी सगळ नाही मंडु शकत... पण त्यांनी मला त्यॉहा पत्त आवर्जुन दिला होता... आणी बजावल होत... ये पत्त न किसीको देना अथवा फ़ाड देना... मला पत्राच उत्तर आल पण ते सगळ्यांपेक्शा वेगळ होत... माझ्या नकळत मला एक भाऊ मिळाला॥ तोही साधासुधा नाही तर सैनिक... त्या नंतर लगेचच राखी पौर्णीमा होती...मी राखी पाठवली... त्याचही उत्तर अगदि संक्षिप्त मिळाल॥ त्या मद्ये अस लिहल होत की ते मला ओवाळणी पाठवु शकत नाहीत कारण ते खुप वर होते॥ परतलो की पथवेन म्हणाले होते... पण अजुन मला माझी ओवळणी नाही मिळाली ना परत कुठल्याही पत्राच उत्तर...मी अजुन वाट बघतेय....
(मी पत्राबद्दल संक्षिप्तपणे नाही लिहु शकत॥ त्या बद्दल क्षमस्व।)


...स्नेहा

सोमवार, २५ फेब्रुवारी, २००८

समुद्राची गाज ऐकली आहे कधी?

समुद्राची गाज ऐकली आहे कधी?
उधाणलेल्या समुद्रची.. धीर गंभीर..
पण बोलकी तर कधी नुसतीच शांत.. स्तब्ध
वार्‍याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर
तो नाद अधिकच कानात शिरतो...
मग डोळे मिटुन वारा झेलत ती गाज
ऐकत बसायची....
तो सुर्यही त्या निनादाच्या ओढीने
समुद्राच्या जवळ येत असतो...
अन् मीही माझ्या नकळत ...
पण सुर्याची ओढ कदाचीत माझ्यापेक्षा जास्त असावी..
त्याला सहज एकरुप होता येत...
पण मी...?
समुद्राची गाज ऐकली आहे कधी?

...स्नेहा

शोध..(?)

मन कुठे ते सापडेना
काही केल्या काहीच उमगेना..
मग कळाल सारच व्यर्थ शोध असतात..
आपल्या सावल्या आपल्या हातात कधीच येत नसतात..
...स्नेहा

बहुदा माझा मुड हा सद्या असाच आहे.... कुणास ठाउक परत मझ्या नकळत परत कसलासा शोध सुरु होइल...

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २००८

संवाद.. नाही वाद.. स्वतःचा स्वतःशी...

आपण मृगजळ नक्की कोणाला म्हणतो? आपल्या अपुर्ण स्वप्नांना.. का अशक्य असाध्य अश्या स्वप्नांना? की मनाच्या वेड्या हट्टांना? मनाचे वेडे हट्ट म्हणजे नक्की कात? मनाने बघितलेल एक वेड स्वप्नच ना? मग त्यालाही मृगजळ म्हणायच?कधीकधी वाटत म्रुगजळ म्हणजे स्वत:च्या अपयशाला दिलेल गोंडस नाव!



छे! मृगजळ म्हणजे असाध्य स्वप्न नाही... ती एक वेडी आशा आहे... जगवुन जाणारी.. जगवणारी.. असाध्य अपुर्ण नाही पण वेड असावं अस एक स्वप्न आहे.. पुर्णत्वाच्या शंका असल्या तरी त्याच्या अस्तीत्वाची ओढ आहे.. मनाला सुखावुन टाकणारी एक शक्ती आहे... त्याला अपयश का म्हणाव?



ते अपयशाचच चिन्ह आहे.. आणी म्रुगजल हे अस्तीत्व हे सांगण्यात कुठे आलयं शहाणपण? वेडं स्वप्न? काय करायचय वेड्या स्वप्नात जगुन? पुर्णत्वाच्या शंका असल्या तरि त्याच्या पाठी लगायच ? कुठली आली आहे शक्ती मनाला सुखावुन टाकणारी? सगळा खुळा खेळ आहे आहे हा... स्वतःशी स्वतः खेळलेला खुळा खेळ.. कधीही घातक ठरु शकतो...



असु देत खुळा खेळ.. असु दे घातक..पण तो जगवतो.. रोजच्या शहाणपणात एक वेडेपणा माफ़ असतो.. आणी शहाण शहाण म्हणुन किती जगाव? एकदा वेडेपणा करुन बघावं ...



इतका वेळ असतोच कोणाला? या शहाणपणाच्या जगात एकही वेडेपणाची चुक क्षम्य नाही... जग किती धावतय बघ.. त्याच्याबरोबर धावायच का आपल्याच विश्वात हरवायच? आणी एक चुक म्हणता म्हणता आपल्याला हजार चुका करायची सवय लागते... मग चुका करायच्याच कशाला? उगाच मनाचे फ़ाजील लाड?



वेळ..वेळ काढला की मिळतो... आणी या शहाणपणाच्या शर्यतीत धावुन तोच तो पणा येतो..काय क्षम्य काय अक्षम्य सगळ शेवटी अपल्याच हाती असत... आणी जगा बरोबर धावता धावता अपण अपले असे किती उरतो? तो वेडेपणा स्वतःला भेटायला का होइना कामी पडतो.. बघ तुझ्या व्यव्हारी भशेत बोलायला लागले मी... पण हो मी हा असा स्वतःला भेटण्याचा प्रयत्न करते.. तुझ्याच भाषेत सांगायच झाल तर एक खुळा प्रयत्न....

शुक्रवार, २५ जानेवारी, २००८

काचेपल्याड....

रोजच्या त्याच त्याच चौकटीत जगताना.... मला नेहमी त्याच्या बाहेरच विचित्र चित्र बघायला मिळत थोड्याबोहोत प्रमाणात.... पण मग ते हादरवणार असत...मागच्या शनिवारी पुण्यात गेले होते.. मी अदिती अन काकु shoppingला गेले होतो... अद्याने आयुष्यात पहिल्यांदा तीन सडेतीन हजाराच shopping केल असेल ती खुप वेगळ्या मुड मद्ये होती... इतकी महागडी shopping स्वतःहाच्या पैशात केल्याचा आंनद... आणी काही वेगवेगळे भाव होते तिच्या चेहर्‍यावर... आम्ही जेवायला म्हणुन डेक्कनवर आलो... एक वेगळच चित्र दिसल आदयाला डोळ्यासमोर... लगेचच desturb झाली... थोड पुढे आल्यावर मला म्हणाली काय आहे ना मी एवढं shopping करताना काहीच विचार केला नाही, त्यांना पाहीलस? मी मागे वळुन बघितल तर खुप कसंस झाल मला... चारपाच फ़ुगेवाली लहान मुलं एकत्र बसली होती.. एकटक नजर होती त्यांची त्या काचेपल्याड असणार्‍या कपड्यांवर... ते दुकान त्याची झकपक... ह्या सगळ्याच कुतुहल त्यांच्या तोंडावर दिसत होत... आम्हा दोघींना काही सुचलच नाही काय कराव ते....दुसर्‍याच दिवशीच दुसर चित्र ती फ़ुगेविकणारी लहानगी.. ती मुल त्यांच्यापेक्षा अजुन लहान होती ६-७ वर्षाची किंबहुना त्यापेक्षाही लहान... रत्यावर होती... बहिण आणी भाऊ अस नात असाव त्यांच... वयात जास्त अंतर नव्हत.. दोघेही मस्ती करत होते रस्त्यवर ...खळखळुन हसत होते... यांना इतक सहज आणी सुंदर हसता कस येत?आज मी ट्रेन ने येत होते.. खिडकीत बाहेर लक्ष होत तर निराळच द्रुष्य बघितल... एक काठी त्या रुळाच्या बाहेर असलेल्या दगडांमद्ये रोवलेली.. त्याचा आधार घेउन त्याला एक टोक अन रुळाला दुसर टोक अशी झोळी बांधलेली होती... वर ऊन बाहेर त्या झोळीतल्या बाळाला झोका देणारी ४ ते ५ वर्षाची त्याची बहिण.. आजुबाजुला त्याचे आईवडिल ... कुठलस काम करत असलेले... त्यांना किंचीतशी पण भिती वाटली नसेल का येणार्‍या जाणार्‍या गड्यांची ?
मला आठवतो तो दिवस... आमच्या शाळेत ख़्रिसमस साजरा होत होता... इनमिन सात मुल आहेत शाळेत पण छानशी ख़्रिसमस ट्री सांताक्लॉज ..केक.. चॉकलेटस.. सगळी मज्जा सुरु होती.. पण मगे वळुन बघितल तर बांध काम करणार्‍या लोकांची चिमुरडी मुल सगळ आर्श्चयाने सगळा प्रकार बघत होती... मला काही सुचल नाही.. मी खाउची एक डिश आणी फ़ुगे त्या उघड्या पोरांना नेउन दिल... त्यांना बर वाटल असाव.. त्या मुलांनी तो केक कसा खायचा हेच समजत नव्हतं... मी खा म्हट्ल्यावर कशाच्याही विचार न करता खपाखप खन्यास सुरुवात केली... का कोण जाणे मिच जास्त सुखावले...
का आपल्या अन् त्यांच्या जगा मध्ये त्या काचेच अंतर राहणारच?डोळे उघडुन पहा आपल्या काचेपल्याड अपल्याला हे दृश्य दिसत...

गुरुवार, २४ जानेवारी, २००८

माझे मोती...

आपण आयुष्यात माळ गुंफ़त जात असतो नकळत.. नात्यांची... एखादी व्यक्ती आपल्याला भेटते काय आणी आपल्याही नकळत आपण तिचे होउन जातो... आणी ती व्यक्तीही तितकीच आपली होते... पण माझी ती माळ अचानक तुटली आणी गेले काही दिवस मी मोती शोधतेय.. त्यातला सगळ्यात आवडता मोती हरवला होता माझा... तो गवसला... हरवला नव्हताच मुळी तो माझ्याच जवळ होता फ़क्त समोर दिसत नव्हता.. हिरमुसला होता अन्.. गुरफ़टुन गेला होता स्वतःच्या नादात...असे बरेच मोती हरवलेत... कधी गवसतिल की नाही माहित नाही..पण आत जेवढे सापडतील ते फ़क्त माझेच असतील... त्यांना परत गुंफ़ायच.. नव्या आयुष्यात.... आता नवीन मोती पण सापडतायेत.... :)



...स्नेहा

बुधवार, १६ जानेवारी, २००८

दामले मास्तर....

दामले मास्तर बी
शिकवा ना थोडं...
शालत म्या कधी गेलोच न्हाय
शालं मंदे जायच म्हनाले
तर आयेन चन्यामन्याच घमेलं हातात दिल
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...
शालत शीकुन म्हने लै म्होट व्हता येत
छान सान कापडं घालुन
हाफ़ीसात जाता येत..
मला बी हाफ़ीसात जायचय
जरा पैका कमवायचाय..
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...
त्या पैक्याने बाच दुकनं पलल
आयेच काम बी सुटल..
तिच्या हताच लै खापरं झालय
त्याला मला त्येलं लावायचयं
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...
तसा चन्यामन्यनबी पैकं मिलत
पन प्योत नाही भरत...
बा च्या दवादारुला पैकं बी न्हाय पुरत...
पन मला सगल चांगल व्हताना बगायचय
शालत जाउन म्होट व्हता येत नसलं
तरी बी ल्यायला वाचायला शिकायचय
दामले मास्तर मला बी शिकवा ना थोडं...

...स्नेहा




हा माझा पहिला प्रयत्न होता घाटी भाषेत लिहण्याचा...मुळची पुण्याची असल्यामुळे जरा भितीच वाटली या भाषेत लिहण्याची... पण आमच्या दामले मास्तरांवरुन सुचली... ;) ही कवीता आधीच लिहली होती इथे आज पोस्ट करतेय.... तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणण्यासाठी उत्सुक आहे.. चु.भु.दे.घे