शुक्रवार, २५ जुलै, २००८

एक झाड ... उन्मळलेलं

आठवतेय ते झाड? त्याचा प्रवास? तुला कसा आठवेन म्हणा? उन्मळुन पडलेल ते झाड... कुठल्याश्या प्रवाहात वाहत होत... त्याची जमीन त्याची माती सगळ सगळ सुटल होत... मग एक दिवस एका नविन पण आपल्याश्या जमिनीत ते परत रुजण्याचा प्रयत्न करु लागल.. मातीही आपलीच वाटत होती त्याला.. मायेचा ओलावा होता त्या मातित.. आईचा स्पर्श होता त्या मातीत.. ती माती जमिन..सामावुन घेत होती त्या झाडाला.. ते झाड परत जगु लागल.. बहरु लागलं... पण कोणाची नजर लागली कोणास ठाउक त्या मातीने हिसकाउन दिल ते झाड... त्या जमिनीने उचकटुन टाकल त्या झाडाला स्वत:ह पासुन... परत कोल्मडल ते बिचार... पण आताशा त्याला सवय झाली होती या सगळ्याची... त्याच्या मूळाशी मुठभर माती शिल्लक होती.. आता जगण्यासाठी तेवढीही माती पुरे ... नुसते श्वास तर घ्यायचेय.. हे झाड जरा निराळच.. आता त्या मुठ दोन मुठ मातीसह बहरतय.. कोलमडल म्हणुन काय झाल.. जगण्याचा प्रयत्न तर करतय... ती जमिन अन माती अशी का वागली.. कदाचित चुकी झाडाचीच असावी.. करण काहिही झाल तरी जमिनही परकीच होती नाही का? पण कोणास ठाउक झाडाचा त्या मातीवर त्या जमिनीवर खुप विश्वास आहे.. कदाचित उन्मळलेल झाड परत उभ राहिलही.. झाडाचा त्या मातीवरचा विश्वास अजुन बहरवतोय झाडाला..

मंगळवार, २२ जुलै, २००८

....

अबोला.. कधी कोणी स्वतःशी अबोला धरलाय?

वेड लागलय का तुला अस कोण करत का?

मग आपण का अस वागतो अबोला धरल्यासारखे?

..... निरुत्तर
हं सगळ जगावेगळ करण्याची हौस ना आपल्याला...

तु गप्प बसशिल का जरा... मला शांत बसायचय...

का पण ह्याला काय म्हणायच? कोण स्वतःशी करत नाही असा आडमुठेपणा मग..?

हे बघऽऽऽऽ जाऊ देत चल आपण काहीतरी वाचायला घेऊ
................


मला एक प्रश्न पडलाय?

आता कोणता?

बघ ना अस म्हणतात प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसत म्हणे..जर अस असेलच तर त्याला प्रश्न का म्हणाव?

कोण म्हणत प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाही म्हणुन.. असतात उत्तरं.. मग काही प्रश्नांची उत्तर का सापडत नाहीत?

मुर्ख ती असतात सापडत बसायची गरज नाही.. उत्तर आपोआप मिळतात.. काही प्रश्नांची उत्तर काळ ठरवतो...

काळ.. ????
हम्म

हा काळ काही वेळेला योग्य वेळी नाही येत त्याच काय?

वेळ योग्य की अयोग्य हे आपण ठरवत नाही आपली कर्म ठरवितात....

बापरे काय झाल तुला एक्दम कर्म वैगेरे? ही ही हीऽऽऽऽ बर बर जर ही कर्म ठरवितात तर मग कधी कधी आपण काहीच केल नसत मग आपण न केलेल्या चुकांची शिक्षा आपण का भोगायची?

परिस्थीतीशी झगडायच आश्यावेळी.. नाही भोगायच..

पण काही वेळा पर्याय नाही उरत झगडायला त्या वेळेस?

मग त्या वेळी मुकाट्याने सहन करायच.. पर्याय नसतो ना? सहन करायच आणी आपल्या वेळेची वाट बघायची .....

आपली वेळ?

ह्म्म स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेउन आपल्या योग्य वेळेची वाट बघायची in btw आपले कर्म करत राहायचे..

बापरे आपण फ़ार जड बोलायला लागलो... चला पुस्तकच वाचुयात.

गुरुवार, १० जुलै, २००८

पेहेचान..

आयिने में तसवीर देखते हुवे
सिर्फ़ तसल्ली रेहेती है
धुंदलासा चेहेरा देखते हुए
ऐहसास होता है
चलो ये तो नही बदला
वैसे तो काफ़ी कुछ बदल चुका है
सिर्फ़ हम ही नही काफ़ी कुछ बदल गया है
अब मेरे गली के चोहराये भी
नही पेहेचानते मुझे
में ही पेहचान ढुंडती हु
शायद कोई मुस्कुराभी दे?
पर अफ़सोस...
वैसे तो काफ़ी कुछ बदल चुका है
घर भी अजनबियोसा बर्ताव करता है
धुल की चद्दर ओढे बैठा है
सब कुछ वैसा ही है
फ़िर भी बदला बदलासा लगता है
दिन के आख़ीर में थक जाता है मन
मायुसी छा जाती है सभी ऑर..
तब घर का आईना
मेरे साथ आसु बहाता है..
चलो ये तो नही बदला...

...स्नेहा