का रे? का असं वागतोस ?
मला रितं करुन पाठ वळवतोस?
अताशा तर आश्रुंचे फुटतही नाहीतं बांध
उघड्या डोळ्यांनी पहा...
आणि खरं आहे ते स्वतःलाच सांग...
तूझ चुकतयं रे...
कहितरी सांभाळताना
कोणालातरी तोडतो आहेस ...
याचा तूलाही त्रास होतोच की याचा...
मग सहजतेचा आव आणुन का बदलतो आहेस वाटा?
म्हणे वाटा बदलल्या तरी समांतर चालू
का म्हणून सगळ आयुष्य मी ओझ्याखाली काढू?
विचार कर अजुन उशीर नाही झाला
लढ जरा आणी सांग या जगाला...
तुझाही जीव अडकला आहे..
आणि तुझ्या नसण्याच्या नुसत्या
विचारानेच कोणाचातरी आयुष्यचं फाटलं आहे...