रविवार, ८ मे, २०११

एक ‘शालीन’ सासू

सासू-सुन हा भारतीय लोकांसाठी विषेतः महिलांसाठी नेहमीचाच हॉट टॉपिक.. सासू-सुनांच्या पराकोटीच्या भांडणांची आपली परंपराचं.. त्यातल्या त्यात आपण नेहामीच आपल्या टि.व्हीपासून शेजारच्या घरात हे वाद पाहतो की एखादी खाष्ट सासू सुनेचा कसा छळ करते.. किंवा एखादी खाष्ट सून म्हातार्‍या सासूचा छळ करते.. पण २१व्या युगात हे चित्र बदलताना दिसतयं.. आता सासवाही सुनेच्या खांद्याला खांदा लाऊन सूनेसोबत मॉल मध्ये शॉपिंग करताना दिसतात... आणि आईसक्रीमची चव चाखत एकत्र बसून सासू-सुनांच्या छळवादी सिरियलसचा आनंद लूटतात... या सासू सुनांना बदलत्या परिस्थितीमुळे का होईना पण नात्यातला तो हळूवार धागा सापडलायं.. ह्या सासवांनीही नोकरी केली..त्यामुळे त्यांना त्यांच्या सुनांचे प्रश्नाची-अडचणींची जाणीव आहे.. त्यामूळेच त्यांनी सुनेच्या संसारात कमी लुडबुड करून जगा आणि जगू द्या हे धोरण स्वीकारलयं...
मात्र.. या अधुनिक युगातल्या सुशिक्षित असलेल्या काही सासवांना सूनेचा मानसिक छ्ळ करताना पहिलं तेव्हा जाणवलं सासू-सुनांची ही दुखरी परंपरा जपण्याचं-जोपासण्याचं जणु व्रतच ह्या सासवांनी घेतलयं. माझ्या पाहण्यातली अशीच एक सासू आहे. विशेष म्हणजे ही सासू निवृत्त शिक्षिका आहे..तिला तिच्या विद्यार्थांनी आदर्श शिक्षिका म्हणून गौरविले सुध्दा..पण वैयक्तीक आयुष्यात मात्र ही ‘शालीन’ सासू आपली लीनता पार विसरून गेलीये.. ती फक्त तिच्या सूनेचाच नाही तर मुलाचाही मानसिक छळ करते.. तेव्हा जाणवतं की ही बाई साक्षर-शिक्षित आहे पण सुशिक्षित नाही.. मग मनाला प्रश्नही पडतॊ की ही माणसं जगासमोर तरी चांगुलपणाचा मुखवटा का चढवतात? घरात स्वतःही मोकळेपणानं जगत नाही ना पोटच्या मुलाला जगू देत ना सूनेला.. दुसर्‍यांचा छळ करून काय मिळत त्यांना एक असुरी आनंद..असुरी समाधान? यांना देव आईपण द्यायलाच विसरला का?
येता-जाता मुलाचा आणि सूनेचा अपमान.. मुलाला तूला डोकच नाही म्हणून हिणवायचं. सुनेला येताजाता सुनवायचं.. स्वतःच्या मैत्रिणींसमोर आव आणायचा की मला किती त्रास होतोय..ही वेळेवर जेवणही करत नाही... वस्ताविक पाहता ह्या बाईला निसर्गानं बहाल केलेलं आईपणही साध्य करता आलं नाही.. स्वतःच्या मुलाला तिने कधी वेळेवर जेवायलाही वाढलं नाही.. भरवणं तर दूरचं... ह्या नापास आईचा मठ्ठ मुलगा मोठ्या ऑरगनाझेशनमध्ये मोठ्या हुद्यावर आहे.. महिन्याला लाखभरतरी पगार घरी आणतो.. तरी आईच्या लेखी तो मठ्ठ्चं आहे.. तो मुलगा आईसमोर स्वतः सिध्द करण्याचा निरर्थक आटपिटा करतोयं.. त्या बाईमध्ये आई शोधतोय.. या सगळ्या गोंधळात तो आपल्या बायकोला होणारा त्रास तिचा होणारा छळ तो कोरडा होऊन पाहतोयं.. आणि ती सून मुग गिळून सगळ मुकाट्याने सहन करतेयं...लग्नानंतर १०-१५ वर्ष झाल्यानंतर्ही ह्या सुनेला आई-वडिलांवरून टोमणे एकावे लागतात.. बाळंतपणात ती त्रासाने अक्षरशः मरणाच्या दारातून परत आली..त्यावेळेस खर्च झालेल्या पैशावरूनही त्या सासूने टोमणे मारले ही हद्द होती त्या सासूची.. खर तर तिच्या या परिस्थितीला कुठे नं कुठे सासूस जबाबदार होती... ह्या आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळवणार्‍या बाईला स्त्रीपणाही जपता आलं नाही ही खंतच आहे.. आजी झाली तेव्हाही सून जरा बाहेर गेली तरी नातीची काही वेळ जबाबदारी घ्यायला सांगितली तर त्यातही यांचा नकार... चिमुकल्या नाती कडे बघुन तरी ह्यांच आजीपण जागायला हवं नं? पण नाही ह्या आजी म्हणूनही नापास ठरल्या...हे सगळ चित्र बघुन मला नेहमी वाटतं हे वेगळे का होत नाहीत.. कदाचित त्या नापास आईला.. नापास शिक्षिकेला एकटं पडलं तर सख्ख्या माणसांची किंमत तरी कळेल...आणि आयुष्याच्या उत्तरार्धात तरी त्या विक्षिप्त बाईला.. स्त्रीपणाची.. आईपणाची..जाणीव होईल..
हे झाल एक उदाहरण...एका सासूच.. या अधुनिक काळात अशा ब‍‍र्‍याच सुशिक्षित सासवा आहेत. ज्या आपल्या सुनांचा असा छ्ळ करतात..अर्थात छ्ळ सहन करणार्‍या सोशिक सुनांची संख्या कमी असली तरी आहे..हे महत्वाचं.. कदाचित सु्शिक्षित स्त्रीयांच्या आत्महत्येच प्रमाण वाढण्याच हेही एक कारण असावं.. या स्त्रीयांना न्याय केव्हा मिळणारं.. आणि अधुनिकतेची वाटचाल करणार्‍या आपल्या भारताला लागलेलं सासू-सुनांच्या नात्यातल्या कडव्या-दुष्ट परंपरेच ग्रहण केव्हा सुटणारं हे देवच जाणे.. पण याचा प्रत्येक स्त्रीने विचार करायला हवा हे नक्की...

(हे सगळ इथे लिहण्याचे कारण हेच की कदाचित हा लेख एखाद्या खाष्ट सासूच्या वाचनात आला तर काही तरी जाणीव होईल तिला स्वतःच्या स्त्रीत्वाची)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: